हा ब्लॉग शोधा

रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

तडका - शेतकर्‍याचं जीणं

शेतकर्‍याचं जीणं

पाऊस नाही पडला तर
आत्महत्येनं मरतो आहे
तर पडत्या पावसात कधी
निसर्ग हत्या करतो आहे

का शेतकर्‍यांच्या नशिबी
हे संकटांचंच ठाणं आहे,.?
इकडे आड,तिकडे विहिर
हेच शेतकर्‍याचं जीणं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा