संप
पशु-पक्षांच्या माना-पानाचं
रूढी-परंपरेत गूढ भासतं
पितृपाठाची सुरूवात होता
कावळ्यालाही महत्व आसतं
जर विचार करण्याची क्षमता
कावळ्यांनाही दिली असती
तर स्वत:ची किंमत कदाचित
त्यांनाही कळून आली असती
मागण्या कशा करायच्या हे
त्यांच्याही लक्षात आले असते
अन् वेग-वेगळ्या खाद्यासाठी
कावळ्यांनी संपही केले असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा