हा ब्लॉग शोधा

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०१५

तडका - बळीराजा

बळीराजा

कधी येणार बळीचं राज्य
सुखही सारं गोठलं आहे
दुष्काळ आणि महागाईनं
वामन होऊन लुटलं आहे

फास घेतोय,विष पेतोय
बळ का गळतंय बळीचं
मरू नको रे बळीराजा
सांगणं हे तळमळीचं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा