पाण्याचे स्थलांतर
इकडचे तिकडे गेले पाहिजे
तिकडचे इकडे आले पाहिजे
किमान दुष्काळी परिस्थितीत
पाण्याचे स्थलांतर झाले पाहिजे
मात्र माणसांच्याच मदतीसाठी
माणसांचे माणूसपण कडवे होते
अन् पाण्याच्या स्थलांतरासही
प्रांतीय आकुंचन आडवे येते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा