हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०१५

तडका - रक्षा बंधनाच्या निमित्ताने

रक्षा बंधनाच्या निमित्ताने

रक्षाबंधनाने समाज बदलेल
या आशेवर कदापी जाऊ नये
कुणीतरी रक्षण करील म्हणून
बहिणींनो हतबल राहू नये

स्वत:चं रक्षण करण्यासाठी
स्वत: दक्ष असायला पाहिजे
समाजाच्या बदलत्या दृष्टीवर
सदैव लक्ष असायला पाहिजे

रूढी परंपरांचे असे विधी
जरूर जरूर छंदले जावे
मात्र रासवटांच्या मनालाही
नैतिक बंधनं बांधले जावे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा