मोदी साहेब,...!!!!
बिहारच्या निवडणूका आहेत
म्हणून तुम्ही त्यांना पॅकेज दिलं
आमचा मुळीच याला विरोध नाही पण
सांगा आम्ही तुमचं काय नुकसान केलं,.?
द्यायचं होतं आम्हालाही पॅकेज एक
खरंच झाले असते शेतकरी खुश
तोडले असते गळ्याचेही फास
अन् त्यागलं असतं पिण्याचं विष
तुमचा अच्छे दिनचा नारा साहेब
शेतकरी अजुन ना विसरले आहेत
पण आता कळेनासंच झालंय की
अच्छे दिन कुणाला आले आहेत,.?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा